काल मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषणाला स्थगिती दिली गेली आहे मात्र लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथे मराठा त्याच्या काही काळ अगोदर आंदोलकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. सरकार वेळ काढू धोरण करत आहे असे म्हणत गोविंद देशमुख यांनी आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
बोरगाव काळे येथील गोविंद मधुकर देशमुख यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन 50 टक्के च्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करावे या मागणीसाठी 72 तासाचे उपोषण केले होते. दिनांक 02 /11/2023 सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत म्हणून काल 5:00 वाजता आपल्या स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
आज पहाटे त्यांनी आत्महत्या केल्याची बाब त्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांना लक्षात आली. तर मोठ्या प्रमाणात धावपळ करत त्याचा मृतदेह उपोषण स्थळी घेऊन येण्यात आला.
आज त्यांचा मृतदेह बोरगाव काळे येथील उपोषण स्थळी आणण्यात आला होता. आजूबाजूच्या अनेक गावातील मराठा आंदोलन यावेळी हजर होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आत्महत्याग्रस्त युवकाच्या कुटुंबातील काय व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी.
आंदोलकांची भूमिका लक्षात घेत प्रशासनांना मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू केली आहे. उपोषण स्थळी तहसीलदारांना पाठवण्यात आल आहे ..चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयास सुरू आहे . आजूबाजूच्या गावातील अनेक लोक यावेळी उपोषण स्थळी हजर आहेत. मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातील महिला वर्ग उपोषण स्थळे दाखल झाला आहे.
video link